कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाण्याच्या प्रवाहामुळे कसबा बावडा येथे असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत गेल्या आठ दिवसांपासून कमालीची वाढ झाली होती.
राजाराम बंधारा आठ दिवस पाण्याखाली असल्यामुळे आज पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्यावर टाकण्यात आलेला सुमारे 10 ते 12 इंचाचा स्लॅप वाहून गेला आहे. ही घटना आज सकाळी स्थानिकांच्या लक्षात आली असून स्लॅब चा काही भाग तर प्रवाहासोबत वाहून सुद्धा गेला आहे. सध्या राजाराम बंधारा धोकादायक स्थितीत असल्याने त्यावरून वाहतूक होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.