नवी दिल्ली – वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul gandhi) हे शनिवारी त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यावर जयपूरला पोहोचले. येथील भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी महाराणी महाविद्यालयातील (maharani college) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल एका विद्यार्थिनीसोबत स्कुटीवर पाठीमागे बसले आणि कॉलेजच्या बाहेरील रस्त्यावर त्यांनी सुरक्षेसह प्रवास केला. (Rahul gandhi scooter travel)
यावेळी राहुल गांधींनी हेल्मेट देखील घातले. त्यांनी महाराणी महाविद्यालयाच्या वाचनालयालाही भेट दिली. कॉलेजच्या प्राचार्या नीलिमा सिंग यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) जयपूरला पोहोचले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. खरगे आणि गांधी यांच्या हस्ते मानसरोवर परिसरात प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण करण्यात आले.
सचिन पायलट म्हणाले काँग्रेसचे सरकार स्थापन होईल
मानसरोवर येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना सचिन पायलट (sachin paylat) काँग्रेस कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना म्हणाले, 2023 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल. तर 2024 मध्ये इंडिया आघाडी जिंकेल. तर पीसीसी प्रमुख दोतासारा म्हणाले की, ईडी, सीबीआय आणि आयकर छापे घालून मोदी सरकार आम्हाला घाबरवू शकत नाही. आमचे नेते राहुल गांधी म्हणतात घाबरू नका.