मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.
गौतमीचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मि ळणं देखील मुश्किल आहे. तर दुसरीकडे गौतमीवर टीकाही केली जाते तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या सगळ्यात आता गौतमीने तिच्या लग्नाबाबत (wedding) भाष्य केलं आहे. एका प्रसिद्ध चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या लग्ना बाबत भावना व्यक्त केली आहे.
यावेळी गौतमी पाटीलला तू लग्न कधी करणार आणि कसा मुलगा पाहिजे? असं विचारण्यात आलं. यावर गौतमी म्हणाली, “माझं आतापर्यंत जे झालं आहे, सुरूवातीपासून ते आतापर्यंत ते सगळं स्वीकारणारा मुलगा मला पाहिजे असल्याचे तिनं सांगितलं.
शिवाय इतक्यात मी लग्न करणार नाही. मी अजून 25 शीत आहे, त्यामुळे माझा लग्नाचा विचार नाही. पण जेव्हा केव्हा लग्न करणार तेव्हा तुम्हाला सांगेन..’ असं ती यावेळी म्हणाली.