मुंबई – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल (सोमवारी) मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोरदार टीका केली. यानंतर आता या सभेबाबत भाजपसह शिंदे गटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भीतीने हे तिन्हही पक्ष एकत्र आले असलयाचे म्हंटले आहे.
कालच्या सभेत उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता आशिष शेलार यांनी एक ट्विट करत सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे.
ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात,”आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात. पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे.दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ”
आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात…
पण ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे.
दुसरं कारण
मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 1, 2023
मुंबई तोडणारवरून मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य
वज्रमूठ सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “निवडणुका आल्या की, काही लोक म्हणतात मुंबई तोडणार असे म्हणतात. कोण मुंबई तोडणार आहे? कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही. ही हिंमत करताही येणार नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. मुंबई तोडणार असं सांगून मुंबईकरांची मतं घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नाला यश मिळणार नाही. कारण मुंबईत आम्ही काम करत आहोत. मुंबई बदलते आहे हे मुंबईकर जाणून आहे.”