संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील म्हाळुंगी नदीवरील चिकणी नळवाडी (आमराई) यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
चिकणी आणि नळवाडी या गावांना जोडणारा पूल आहे. या पुलाचे काम निकृष्ट झाल्यामुळे त्याचा बराचसा भाग यापूर्वीच तुटलेला होता. त्यात म्हाळुंगीला पूर आल्याने पुन्हा बराचसा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. संबंधित विभागाने पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेस या विभागालाच जबाबदार धरण्यात येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.