Imtiyaz Jaleel on loksabha । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपावरून सर्वच पक्षात मतभेत होताना दिसतायेत. त्यातच आता राज्यातील आणखी एक महत्वाचा पक्ष ‘एमआयएम’ने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. त्यांच्या या घोषणेमुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय.
इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा Imtiyaz Jaleel on loksabha ।
एमआयएम महाराष्ट्रात इतर पक्षातील चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्त वहिनीशी बोलताना म्हटले आहे. एमआयएम भाजपला पाठिंबा देणार का या प्रश्नाला उत्तर देताना जलील यांनी स्पष्ट केलं आहे की, उमेदवार कोणत्याही पक्षाच्या असो चांगल्या उमेदवाराला पाठींबा देणार असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. त्यामुळे पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे गुलदस्त्यात आहे.
एमआयएम किती जागा लढवणार?
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं, आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहतोय कोणता पक्षाला कोणती जागा मिळणार, कुणाला उमेदवारी मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची यादी अजून फायनल झालेली नाही. आम्ही सहा जागा लढवण्याचा ठरवलं होतं, मात्र आता आणखी इच्छुकांची संख्या वाढत आहे. इच्छुकांची यादी घेऊन आज हैदराबादला जाणार आहे. ओवेसी यांनी एक खाजगी एजन्सी नेमली होती त्याचा अहवाल देखील लक्षात घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलंय.
एमआयएम आणि वंचित युती होणार? Imtiyaz Jaleel on loksabha ।
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास एमआयएमची दारं उघडी असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी किंगमेकर होण्यासाठी एमआयएमसोबत युती करण्याचं आवाहन जलील यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी आमची दारं खिडक्या सगळ उघडं आहे असंही जलील म्हणाले आहेत.
ही बातमी वाचा
राज्यात पुन्हा पुन्हा ‘जय मीम, जय भीम’ पॅटर्न….? ; इम्तियाज जलील म्हणाले,”प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची…”