मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे वेळोवेळी आपल्या वक्तव्याने नेहामीच चर्चेत आणि अडचणीत येत असतात. त्यातच आता त्यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाजी महाराज बलिदानासंदर्भात बोलताना त्यांनी, “आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असे म्हणत नवा वाद वाद निर्माण केला आहे.
यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’अशा मानसिकतेचा माणूस गुरुजी होऊ शकत नाही. लोकांना चांगलं ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुजी म्हणतो. अशा लोकांना आपण गुरुजी म्हणत नाही. असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’ एक अजमल कसाब नावाचा दहशतवादी होता. त्याचा भारताला बंदुकीच्या जोरावर कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. त्याच प्रमाणे आपल्या देशात (संभाजी भिडे) सारखे लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. मात्र ते आपल्या जिभेचा वापर करतात. त्यांचा देखील उद्देश या देशाला कमजोर कसं करता येईल.