जिनिव्हा : भारतात लागू झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा थयथयाट केला आहे. भारताविरोधात अणुयुद्ध छेडण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
“ग्लोबल रेफ्युजी फोरम’मध्ये सहनिमंत्रक म्हणून सहभागी झाल्यावर ते बोलत होते. दक्षिण आशियाला भेडसावणारा निर्वासितांचा प्रश्न सर्वाधिक मोठा आहे, असे ते म्हणाले.
बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात धार्मिक छळ झाल्यामुळे निर्वासित झालेल्या बिगर मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या कायद्यासंदर्भात इम्रान खान बोलत होते. भारतातील या कायद्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होईल, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली.