नवी दिल्ली – पाकिस्तानवरील संकटाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आर्थिक संकट आणि महागाई यात खंगून निघालेल्या पाकिस्तानवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले आहे.
यामध्ये भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम झाला आहे. यामुळे त्यांनी भारताला IWT च्या सुधारणेसाठी नोटीस जारी करण्यास भाग पाडले आहे. असं वृत्त एका संस्थेने प्रसारित केले आहे.
India has issued notice to Pakistan for modification of the Indus Waters Treaty (IWT) of September 1960. Notice was conveyed on January 25 through respective Commissioners for Indus Waters: Sources
— ANI (@ANI) January 27, 2023
भारत सरकारने सांगितले की, भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही, पाकिस्तानने 2017 ते 2022 या कालावधीत कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या पाच बैठकांमध्ये या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. या कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.