मुंबई :नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयात ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मते फोडण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला ओपन खुल आव्हान दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनताच काय त्यांचे लोकप्रतिनिधी देखील कंटालळे आहेत. त्यामुळे गुप्त मतदानाची संधी मिळताच, या लोकप्रतिनिधींनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचे विधान परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असं खुल आव्हान चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकारला दिलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.