चंदिगढ – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेत. नवे कायदे शेतकरीविरोधी असून सरकारने ते मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसह शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करतायेत.
याप्रश्नी आंदोलक शेतकरी व सरकार यांच्यादरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र यातून कोणताही तोडगा निघू शकला नाहीये. अशातच आज इंडियन नॅशनल लोक दलाचे सरचिटणीस व हरियाणा विधानसभेचे सदस्य अभय सिंग चौटाला यांनी शेतकरी आंदोलनावरून राजीनामा अस्त्र उपसलंय.
चौटाला यांनी याबाबत हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष ज्ञान चंद गुप्ता यांना एक पत्र लिहलंय. यात त्यांनी, ‘केंद्र सरकारने येत्या २६ जानेवारीपर्यंत कृषी कायदे मागे न घेतल्यास हे पत्र माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा म्हणून स्वीकारावे’ असं म्हंटल आहे.
गत सप्ताहात अभय सिंग चौटाला यांनी राजधानी दिल्लीच्या तिक्रि सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी, ‘देशातील कोणत्याही शेतकरी संघटनेने कृषी कायद्यांची मागणी केलेली नसतानाही केंद्राने हे काळे कायदे थोपवले. यामागे उद्योजकांना फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश आहे.’ असा आरोप केला होता.
काय म्हटलंय पत्रात?
चौटाला यांनी विधानसभा अध्यक्षांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात, ‘सरकारने तयार केलेली परिस्थिती पाहता मला असं वाटतं की विधानसभेचा एक जबाबदार सदस्य म्हणून मी अशी कोणतीच भूमिका निभावू शकणार नाही ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होऊ शकेल. एका असंवेदनशील विधानसभेचा सदस्य असण्याला काहीही अर्थ नाही. या सर्वांचा सारासार विचार करता जर केंद्र सरकारने येत्या २६ जानेवारीपर्यंत हे कायदे मागे घेतले नाहीत तर हे पत्र माझा राजीनामा म्हणून स्वीकरावे.’ असं म्हटलंय.
Chaudhary Devi Lal used to fulfil his promises & even gave up PM post for VP Singh. I’ve spoken to people from 30-32 villages so far. They’re of the view that I should step down. If demands aren’t met by Jan 26, then my resignation be accepted on 27th: Abhay Singh Chautala, INLD https://t.co/3mxeIfZh4M pic.twitter.com/jWwlXDJ7Lq
— ANI (@ANI) January 11, 2021