मुंबई – विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (TC\LC) नसेल तरी प्रवेश नाकारला जाणार नाही, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंबंधीचा शासन आदेशही सरकारने जाहीर केला आहे.
प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळते. #RTE #माझंशिक्षणमाझाहक्क #EducationForAll pic.twitter.com/irjcA4nHG0
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021
शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ L.C.\T.C. नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांनातात्पुरता प्रवेश देऊन मा.शा.सं. मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी.शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे.हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळाप्रमुख यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.
विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 17, 2021