मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार राज्यात परत येण्याची चिन्हे नसून मोठ्या प्रमाणात राज्यात राजकीय हालचाली घडत आहेत. याच प्रकरणावरून आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे आक्रमक झाले असून त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं ‘ असे सुभाष देसाईंनी म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांबाबत बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात असते तर कोणत्याही बिळातून पोलिसांनी त्यांना फरफटत आणलं असतं ‘ म्हणूनच ते घाबरून गुवाहाटीला जाऊन बसले आहेत, असा हल्लाबोल सुभाष देसाई यांनी केला आहे. सुभाष देसाई यांनी पहिल्यांदाच बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांना देसाई यांनी धमकावले आहे.
ज्या दिवशी हे बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेना भवनात दाखल होतील. इतरांना एअरपोर्टवरून बाहेर पडूच दिलं जाणार नाही. 72 तासांपेक्षा अधिक विमानतळाला घेरावा घालण्यात येईल, अशी धमकीच सुभाष देसाई यांनी दिली आहे.