मुंबई – मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी हिंगोलीत निर्धार सभा झाली. या सभेद्वारे ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटाचे स्थानिक बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. त्यात त्यांनी बांगर यांचा उल्लेख साप म्हणून केला.
ठाकरेंच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. त्यात त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या कार्यक्रमाला वादग्रस्त कालीचरण महाराजही उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी पोलिसांना भगव्या टोप्या देण्याचे वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.