मुंबई – अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गटासह भाजपमध्ये प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाट,
म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष थेट भाजपसोबत जाणारी नाही, पण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला भाजपने आपल्या सोबत घेतल्यास आम्हीं सरकार बरोबर राहणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा राज्यातील विश्वासघात करणारा पक्ष आहे अशी टीकाही त्यांनी केली.
मुळात शिवसेनेने या आधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली होती. ते जनतेला आवडले नव्हते म्हणूनच आम्ही मूळ शिवसेना सोडून बाहेर पडलो होतो. आता आम्हाला पुन्हा हा प्रयोग करायचा नाहीं असेही ते म्हणाले. अजित पवारांना राष्ट्रवादीत काहीं स्थान नाही, ते एकटे बाहेर पडून सरकार बरोबर येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू परंतु त्यांचा गट किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेण्यास आमचा विरोधतच राहील.
त्यांचा मुलगा पार्थ पवार याआधी निवडणूक हरल्याने अजित पवारांची नाराजी असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेच्या प्रकरणाशी त्यांच्या नाराजीचा संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पहाटेच्या शपथ विधी बाबत अजित पवारांन अजून खुलासा केलेला नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.