RR vs RCB IPL 2024 Eliminator, Score Update : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीच्या जवळ जाईल, तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल. विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. कोलकाताने हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरी गाठलेली आहे.
आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या आहेत. राजस्थानसमोर विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य आहे. पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. बंगळुरूची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या षटकांमध्ये, RCB देखील त्याच परिस्थितीला बळी पडला जे क्वालिफायर सामन्यात SRH सोबत झाले होते.
या सामन्यात विराट कोहलीने 24 चेंडूत 33 धावांची खेळी करत आयपीएलमधील 8 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रजत पाटीदारही चांगल्या लयीत दिसला, पण 22 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म संपण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण रविचंद्रन अश्विनने त्याला शून्यावर बाद केले. राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Innings Break!
A target of 1️⃣7️⃣3️⃣ set by #RCB 🎯
Who is going to #Qualifier2 ? 🤔
Chase on the other side 👉
Scorecard ▶️ https://t.co/b5YGTn7pOL #TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/54RfT3O9pO
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 37 धावांची भागीदारी झाली, मात्र पाचव्या षटकात 17 धावा काढून डू प्लेसिस बाद झाला. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आरसीबीने 1 गडी गमावून 50 धावा केल्या होत्या आणि संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. पुढील काही षटकांत धावगती खूपच कमी झाली, त्यामुळे 10 षटकांत बेंगळुरूची धावसंख्या 2 बाद 76 धावा झाली. कमी रनरेटमुळे, कॅमेरून ग्रीनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना 27 धावांवर आपली विकेट गमावली. तर अश्विनने पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला गोल्डन डकचा बळी बनवले.
IPL 2024 : ‘जे कोणी करू शकलं नाही ते विराट कोहलीने करून दाखवलं; लवकर OUT होऊनही रचला इतिहास…
अवेश खानने 15 व्या षटकात पाटीदारची बॅटही शांत केली, त्याला 34 धावा करता आल्या. 15 षटकांत संघाने 5 विकेट गमावून 125 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकला केवळ 11 धावा करता आल्या असल्या तरी महिपाल लोमराने 17 चेंडूत 32 धावांची तुफानी आणि महत्त्वाची खेळी खेळली. शेवटच्या 5 षटकात बेंगळुरूच्या फलंदाजांनी 47 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 170 च्या पुढे नेली. राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हैदराबादप्रमाणेच बेंगळुरूनेही केली चूक…
क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबादला प्रथम खेळताना 159 धावा करता आल्या होत्या. एसआरएचच्या कमी धावसंख्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे टॉप ऑर्डरचे अपयश. हैदराबादची दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज जबाबदारी घेऊ शकले नाहीत आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना विकेट गमावत राहिले. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रजत पाटीदार, दिनेश कार्तिक आणि कॅमेरून ग्रीन हेही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना बाद झाले.