गुलबर्गा : जाहीर सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी नकार दिला आहे. मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेलं नाही. राज्य घटनेच्या आधीन राहूनच मी बोललो आहे. माझ्या भाषणात काही चुकीचे नाही. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच वारीस पठाण यांनी काढता पाय घेतला. तसेच मी हिंदूंचं तर नाव देखील घेतले नाही, असे पठाण म्हणाले.
कर्नाटकातील गुलबर्गा इथे 15 कोटी मुस्लिम 100 कोटी हिंदूंना भारी आहे; असे वादग्रस्त त्यांनी केले होत. तेव्हा ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे देखील उपस्थित होते. “का” कायद्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शना ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केले होत.
“केवळ शब्दाला शब्दांनी उत्तर देता येणार नाही, ‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलोय. आम्हाला सगळ्यांना सोबत चालावे लागेल. स्वातंत्र्य मागितल्याने मिळत नाही, तर ते हिसकावून घावे लागते’; असे ते जाहीर सभेदरम्यान बोलले होते.