कोलकाता: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी कोलकाता येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले की, अमित शहा हे केवळ भाजपचे नेते नाहीत तर देशाचे गृहमंत्रीही आहेत. परंतु त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ नव्हे तर ‘सबके साथ सर्वनाश’ केला आहे.
“नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मागे घ्या, नाहीतर तुम्ही इथे कसा अंमलात आणता हे मी पाहते.” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला. भाजप संपूर्ण देशाला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे पण आम्ही असे होऊ देणार नाही. अमित शहा म्हणतात की आधार कार्ड (नागरिकत्वाचे) पुरावे नाही, मग आपण सर्व काही त्याच्याशी का जोडत आहात?, असा प्रश्न देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरूद्ध झालेल्या निषेधावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशाची काळजी घ्यावी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन करेन. आपले काम आग विझविणे आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यांतर्गत देश पेटणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी अमित शहा यांना विनंती करतो.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात एस्प्लानेड परिसरातील हावडा मैदान ते डोरिना क्रॉसिंगपर्यंत मोर्चा काढत आहेत. त्यांच्या नो सीएए नो एनआरसी रॅलीचा आज तिसरा दिवस आहे.