मुंबई – देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… हे तेच नाव आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्याच सेनेने पराभूत करून घेतले. आणि फडणवीस यांच्या रणनीतीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, सरकारसोबतच पक्षही हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. सत्तेच्या या खेळात त्यांनी सांगितलेला एक शेर चांगलाच व्हायरल होत आहे -‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना…मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा.’
1 जून 2022…निमित्त होते पुण्यातील पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनाचे. यादरम्यान, फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील चुकांबाबत सांगतांना म्हंटले होते की,’एका चुकीच्या पाऊलमुळे सत्तेचा खेळ गमावला. मात्र यावेळी खेळ चांगला खेळणार’ असं देखील ते म्हणाले होते त्याचप्रमाणे त्यांनी त्यांनी यावेळी कुठलीही चूक न करता शिवसेनेला शिवसेनेकडूनच प्रभाव केले.
पडद्यामागे राहून सूत्र हालवली
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा खेळ बिघडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रिप्ट लिहिली होती. पण पूर्वीसारखी चूक होऊ नये म्हणून फडणवीस योग्य वेळेची वाट पाहत राहिले. त्यामुळेच यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत पडद्याआड काम केले. चाणक्यनीती वापरत सरकार पाडण्याची योजना बनवली, पण फडणवीस शेवटपर्यंत दिसले नाही. या नियोजनातून हिंदुत्वाची विचारधारा समोर आली. ते जवळपास वर्षभरापासून शिवसेनेचे ज्येष्ठ आणि तगडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते, असे बोलले जात आहे. पण त्याची माहितीही कुणाला मिळू दिली नाही.
हनुमान चालिसाच्या मुद्यानंतर खेळ संपला..!
एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे मोठे पुरस्कर्ते मानले जातात. ठाणे आणि आजूबाजूचा परिसर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली उद्धव ठाकरे काम करत असल्याची चर्चा होती. त्यातच हनुमान चालीसा प्रकरणाने आगीत आणखीनच भर टाकली त्यामुळे शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार खूश नव्हते.
अपमानाचा बदला!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी शिंदे यांचाही काही मुद्द्यावरून अपमान केला होता. त्यानंतर फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिंदे यांनी शिवसेनेत खेळ सुरू केला. रातोरात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांना सीमा ओलांडून सुरत गाठण्यात आले. 2 दिवसांनी सर्व आमदार गुवाहाटीला पोहोचले. जिथे हळूहळू बंडखोर आमदारांची संख्या 39 वर पोहोचली. याशिवाय अपक्ष आमदारही तेथे पोहोचले.
आमदारांचे बंड
एकदाही बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष सोडण्याची चर्चा केली नाही, यावरून या योजनेची ताकद समजू शकते. त्यांनी एकदाही बाळासाहेबांच्या तत्त्वांपासून दूर जाण्यास सांगितले नाही. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याबाबत एकदाही बोलले नाही. तर आकड्यांच्या जोरावर ते स्वतःला शिवसेना असल्याचा दावा करत राहिले.
भाजपचे मौन
या सार्या गदारोळावर फडणवीस आणि भाजपच्या कोणत्याही नेत्याचे विधान केवळ शिवसेनेची अंतर्गत बाब असल्याचे समोर आले. मात्र, आपले सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी फोनवरूनही चर्चा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान फडणवीस फक्त एकदाच उज्जैनमध्ये महाकालच्या दर्शनासाठी बाहेर पडले. उर्वरित वेळ, ते त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यातून मुख्य संघातील सदस्य आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासोबत बुद्धिबळ खेळत राहिले.
…आणि खेळ संपला
पॉवर गेमचा भडका उडाला असताना फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि हा खेळ संपुष्टात आणला. फडणवीसांनीच या खेळात हिंदुत्व विचारसरणीला सर्वात मोठे हत्यार बनवले.