मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे हे भावुक झाल्याचे दिसले. त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार मधील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. आक्रमक न होता कोणाला न दुखवता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या रुपाने एक चांगले नेतृत्व लाभले. कोरोना काळात परिस्थिती बिकट बनली होती. संपूर्ण देश हातबल झाला होता. मात्र या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणा सक्षमपणे राबवत राज्याला संकटातून बाहेर काढल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले , बुधवारी संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ‘ हा विषय धार्मिक नाही तर स्वराज्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. शिवाय आमदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी बोलताना थोरात यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे नसल्याचे म्हंटले होते. यावर देखील थोरात यांनी प्रतिक्रिया दिली असून ते चव्हाण यांचं वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.