हिंगोली (शिवशंकर निरगुडे): हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील बाबळी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या आठवणीत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील संजय दादाराव शिंदे (४५) यांच्या पत्नीचे दहा ऑगस्ट २००५ रोजी नागपंचमीच्या दिवशी निधन झाले होते. त्यानंतरच्या काळात संजय हे पत्नीच्या आठवणी नेहमीच काढत होता. दरम्यान, काल नागपंचमीच्या दिवशीच पत्नीच्या आठवणीत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्याने त्यांनी गावांमध्ये माहिती देतात अनेकांनी घटनास्थळीत मदतीसाठी धाव घेतली. विशेष म्हणजे संजय शिंदे यांनी ज्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्या झाडाखाली आपल्या पत्नीसह असलेला फोटो ठेवून त्यावर लग्नाची तारीख व पत्नीच्या मृत्यूची तारीख लिहून आत्महत्या केली. दरम्यान, संजय यांचे मोठे बंधू प्रभाकर दादाराव शिंदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून असं म्हटलं आहे की, त्यांची हयात असलेली दुसरी पत्नी अलका संजय शिंदे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून माझ्या भावाने आत्महत्या केली आहे.
प्रभाकर यांच्या फिर्यादीवरून अलका यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.संजय यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या निधनाने गावात शोककला पसरली आहे.