तौक्ते चक्रीवादळाचा “टायगर 3′ या चित्रपटाच्या सेटला फटका बसला आहे. यात सलमान खानचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे संपूर्ण चित्रपटाचा सेट उडून गेला. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती होण्याअगोदरच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
“टायगर3′ हा सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर कदाचित चित्रपटाचे चित्रीकरण काही काळ थांबवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारकडून परवानगी घेत सलमानने हा सेट मुंबईमध्ये उभारला होता. मात्र चक्रीवादळामुळे संपूर्ण सेटचे नुकसान झाले.
दरम्यान सलमान खानचा “राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
सध्या सलमान कभी ईद कभी दिवाळी, अंतिम, टायगर3 आणि आगामी प्रोजेक्टद्वारे भेटीस येणार आहे.