मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड पुकारला आहे. या बंडात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. त्यामुळे सरकार कधीही कोसळणार अशी शक्यता व्यक्त होतेय. त्यातच बंडखोर गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वारंवार आव्हान देण्यात येत आहे. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. काहीसे मवाळ झालेले राऊत पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहिला मिळालं. ते शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल चढवला. बहुमत आहे तर मग लपून का बसलात, असा सवाल राऊत यांनी केला. बंडखोर आमदार म्हणतात, हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून आम्ही बंडखोरी केली. अरे पण यांच्यातील बरेच जण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापमधून आलेत. त्याचं कशाचं आलं हिंदुत्व, अशी टीका राऊतांनी केली.
दरम्यान राऊत यांनी बंडखोर मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले अब्दुल सत्तार यांचं हिंदुत्व कसकाय धोक्यात आलं, हे कळत नाही. राऊत पुढं म्हणाले की, तुम्ही परत या, आपण महाविकास आघाडीतूनही बाहेर पडू. पण इथ येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बोला, अस आवाहन राऊत यांनी केलं.