नवी दिल्ली – बिहारमध्ये दारूबंदी कायदा 2016 पासून लागू आहे. असे असतानाही शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या धोरणामुळे व दुर्लक्षामुळे सर्वच जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, दारूमुळे आतापर्यंत 243 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या 243 जणांच्या मृत्युची जबाबदारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या आरोपाबाबत मुझफ्फरपूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीएम नितीश कुमार यांच्यासह अबकारी आयुक्त विनोद सिंग गुंजियाल, मुझफ्फरपूरचे उत्पादन शुल्क अधीक्षक संजय राय आणि बिहारच्या सर्व जिल्ह्यांच्या उत्पादन शुल्क अधीक्षकांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे.
दारूबंदी कायदा लागू असतानाही राज्यात विषारी दारूची विक्री होत आहे. याच्या सेवनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. छपरा, सिवान, मुझफ्फरपूर, बेतियासह अनेक ठिकाणी झालेल्या विषारी दारूच्या घटना ही त्याचीच उदाहरणे आहेत. दरम्यान, यायालयाने ही तक्रार मान्य केली आहे. याप्रकरणी 16 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
सुशील कुमार असे तक्रार दाखल करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. तक्रार दाखल केल्यानंतर सुशील कुमार म्हणाले की, राज्यात दारूबंदी कायदा 2016 पासून लागू आहे. तरीही सर्वच जिल्ह्यात देशी-विदेशी दारू विनाअडथळा विकली जात आहे. दारू तस्कर लोकांच्या घरी दारू पोहोचवतात. बिहारमध्ये व्यसनमुक्तीसाठी कोणतीही जनजागृती मोहीम न राबवता बिहारमध्ये 2016 साली अचानक दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. तस्कर शेतात आणि कोठारांमध्ये दारूचा व्यवसाय करतात. विषारी दारू प्यायल्याने शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक अपंग झाले आहेत.