नारायणगाव -खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे 40 विद्यार्थी ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत नुकतेच पुण्यात परतले आहेत.
भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमधील केवायआयव्ही युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्याने त्यांना लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद झाल्याने परत येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी खासदार डॉ. कोल्हे यांना मदतीची विनंती केली होती.
डॉ. कोल्हे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून फ्लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थी मायदेशी परतले आहेत.