पुरंदर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस गाव एक ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखले जाते मात्र या गावांमध्ये असणारा ऐतिहासिक वारसा कालवश होण्याच्या मार्गावर आहे.
या गावांमध्ये भरपूर काही ऐतिहासिक ठेवा असल्याचा इतिहास तज्ञांचा अंदाज आहे त्याचबरोबर गावच्या विविध भागांमध्ये मंदिरे आहेत मात्र दिवसेंदिवस या मंदिराकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा कालवश होण्याच्या मार्गावर आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.
माळशिरस गावातील तरुण इतिहासप्रेमी युवकांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक ठेव्याकडे लक्ष देऊन याचे जतन करणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी हा सांस्कृतिक वारसा जतन करणे गरजेचे असून युवकांनी याकडे लक्ष द्यावे