मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.
अशातच आज बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांनी कंगनाची कार्यालयाचा काही भाग अतिक्रमण असल्याचे सांगत पाडला.
अशातच आता कंगनाची बचावात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर रिंगणात उतरले असून त्यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. कंगनाला केंद्राकडून देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत आज शिवसेनेचे मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे.
सामनातील टीकेबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकूर यांनी, “मी सामना वाचत नाही. मात्र शिवसेनेची मुळं आता नष्ट होत असून सेनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. शिवसेनेने काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीनंतर आता त्यांचीही अवस्था काँग्रेस सारखीच झाली आहे. सत्तेत राहण्यासाठी शिवसेनेकडून असं बोललं जातंय.”
Don’t want to talk about Saamna, I didn’t read it but roots of Shiv Sena are being finished. The objective with which Shiv Sena was formed…its situation became like Congress ever since it came to power with them. They’re saying this to safeguard their power: Himachal Pradesh CM https://t.co/fhDshoGqdH pic.twitter.com/ID0aFG3te1
— ANI (@ANI) September 9, 2020
“मी महाराष्ट्र सरकारच्या कारवाईचा निषेध करतो. हिमाचलची कन्या असलेल्या कंगनाने केवळ तिच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग केला होता. मात्र महाराष्ट्र सरकार बदला घेण्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे.” असंही ठाकूर म्हणाले.
The conduct of Maharashtra government is unfortunate, I condemn it. The daughter of Himachal Pradesh, Kangana Ranaut raised her voice and expressed her opinion. They (Maharashtra government) have done this out of vendetta. This is unfortunate: Himachal Pradesh CM Jairam Thakur https://t.co/1KY0x4GrKH pic.twitter.com/lNUwzB78C2
— ANI (@ANI) September 9, 2020
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर कंगनाने संतप्त प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत खालची पातळी गाठली आहे.