पुणे – सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. अकलूज (ता. माळशिरस) येथे अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1359262817746753/
या परिसरातील ओढे- नाले तुडूंब भरले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सोलापूर- बार्शी, वैराग- बार्शी, मोहोळ- वैराग, टेंभूर्णी- अकलूज, अकलूज- बारामती, अकलूज- पंढरपूर, हैदराबाद या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.