नवी दिल्ली – महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रेदशातील किनारपट्टीचा भाग आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण आणि गोवा तसेच कर्नाटक आणि तेलंगणातील काही भागांमध्ये आज पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
या सर्व राज्यांसोबतच तामिळनाडूच्या किनारपट्टीचा भाग आणि अरबी समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.