कोयनानगर – मुसळधार पाऊस पडणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला होता.दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता.
हा अंदाज आज खरा ठरला असून, शनिवारी सकाळपासून कोयना धरण परिसरात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कोयना परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला असून, उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.