मुंबई – देशाच्या वायव्येकडील राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून, त्यामुळे तेथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ झाली आहे. तर काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्र राज्यातील विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा सुरूच असून बुधवारी अकोल्यात ४४ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे अकोला सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
यातच देशातील उष्णतेची लाटमध्ये राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भ यांचा समावेश असून यात पूर्व विदर्भातील जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर इतर जिल्ह्यांना तीन दिवसांसाठी थोडाफार दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,’या तिन्ही दिवसांत अकोल्यातील उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर १० एप्रिलला अकोल्यासह बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असेल.’ असेही सांगितले आहे.
जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
उष्णेतेच्या लाटेची सर्वाधीक झळ विदर्भ आणि मराठवाड्याला बसली आहे. विदर्भातील वातावरण विषम असल्यामुळे कमाल आणि किमाण तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 22.7 किमान तर अकोला जिल्ह्यात 44 अंश सेलिंसअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.