खालापूर – राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेने “होऊ दे चर्चा’ कार्यक्रम हाती घेतले असून मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी खोपोली शिळफाटा येथे कार्यकत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी आमदार सचिन अहिर म्हणाले, कोविड काळात मास्क आणण्यासाठी पण केंद्र सरकारने मदत केली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची ताकत सोबत नसताना आम्ही देशाला एकत्रित करू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी करून दाखविले. या चर्चेला राजकीय चर्चा म्हणून समजू नका. सामान्य नागरिक म्हणून करा. सर्व मुद्दे वस्तूस्थितीला धरून आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनण्याच काम आपण करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला ललित साने, कामगार नेते राजन लाड, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, सल्लागार नविन घाटवळ, जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, डॉ.सुनील पाटील, गजानन पाडगे, युवासेना जिल्हा आधकारी पराग मोहिते, उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख भाऊ सणस, नितीन मोरे, उपजिल्हा संघटीका अनिता पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जैबुनिसा शेख, सुविधा विचारे वैजंयता गायकवाड व शिवसैनिक – युवा सैनिक उपस्थित होते.