कोल्हापूर – केंद्रातील भाजप सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली. मात्र गेल्या सात वर्षात केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूची दरवाढ करून आणि शेतकरी तसंच कामगार विरोधी कायदे करून सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याच काम केलं. या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतींन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दारात जोरदार निदर्शन करण्यात आली.
केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्या सात वर्षातील नियोजनशून्य कारभारामुळ देशाची अर्थ व्यवस्था ढासळली आहे. पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूची प्रचंड दरवाढ झाल्याने सर्वसामान्य लोकांना जगणं मश्किल झालं आहे.
नोटबंदी, जीएसटी सारखे अपयशी निर्णय आणि देशातील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्यांमुळे देशातील शेतकरी आणि कामगार अडचणीत आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारच्या नियोजना अभावी देशातील परिस्थती गंभीर बनली आहे. केंद्रातील भाजप सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरलय या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान मोदींचे पोस्टर हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारे मोदी सरकार चले जाव, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हाताला काळ्या फिती बांधून या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. जयंत आसगांवकर, आ. पी.एन. पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऍडव्होकेट गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, दिपक थोरात, पार्थ मुंडे, बाळासाहेब खाडे, अक्षय शेळके, उदय पोवार, प्रवीण पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, मंगल खुडे, पूजा आरडे, उज्वला चौगुले, वैशाली पाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.