बेल्हे-राजुरी येथील खंडेराया, भैरवनाथ यात्रौउत्सवा निमित्ताने आवटेवाडी येथील यात्रा रद्द झाल्याने होणाऱ्या खर्चात सुमारे दोनशे कुटुंबीयांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिली. राजुरी येथील खंडेराया, भैरवनाथांची यात्रा दि. 17 व 18 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार होती. पण करोना साथीच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमधील बहुतेक सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. या यात्रेला होणारा खर्चामध्ये गावातील गोर गरीब असलेले सुमारे दोनशे कुटुंबीयांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.