पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम्मित रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एच. ए. येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी धम्मराज साळवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र, समता, बंधुता या तत्त्वावर आपले राज्य उभा केले. त्यांनी कधीही इतर धर्माचा द्वेष केला नाही. आपल्याला आपला देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर आपल्याला देखील महाराजांच्या विचारांचा अंगिकार करणे गरजेचे आहे.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रदेश प्रवक्ते विक्रांत शेळके, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप, पश्चिम महाराष्ट्र सचिव समाधान गायकवाड, प्रमोद लोंढे, शमशोद्दिनगाझी शेख, करण शिंदेउपस्थित होते.