श्रीनगर – राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात राजीव गांधी भ्रष्ट नव्हते मात्र काही लोकांच्या प्रभावात येऊन ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफार्स घोटाळा केला. या विधानावरुन काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याच विधानावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सत्यपाल मलिक यांना चांगलाच टोला लगावला आहे. ‘आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत.’ असा टोला सत्यपाल मलिक यांना लगावला आहे.
S Nirupam: When PM called Rajiv Gandhi ‘Bhrashtachari no.1’ he was criticised so much that he can’t say that again. Aisa lag raha hai Satya Pal Malik, Modi ji ki chaaploosi kar rahe hain, chamchagiri kar rahe hain taaki unki kursi bachi rahe. Guvs should maintain dignity. (10.05) https://t.co/bh6NY7Hf25
— ANI (@ANI) May 11, 2019
काही दिवसांपूर्वी, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, सुरुवातीच्या काळात राजीव गांधी भ्रष्ट नव्हते मात्र काही लोकांच्या प्रभावात येऊन ते भ्रष्टाचारी झाले आणि बोफार्स घोटाळा केला. मलिक यांचा कथित ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल होत होता त्यामध्ये राजीव गांधी भ्रष्ट नाहीत असं बोललं जातं होतं. मात्र या ऑडिओ क्लीपवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्टीकरण देताना हे वक्तव्य केलं होतं. तत्पूर्वी संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून “औरंगजेब’ अशी उपमा दिली होती. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते.