नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियासाठी सरकारने ५०० कोटी रुपयांची हमी दिली आहे. आर्थिक डबघाईत सापडलेल्या एअर इंडियाने सरकारकडे गेल्या आठवड्यात २४०० कोटी रुपयांची हमी मागितली होती.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, सरकारने एअर इंडियाला ५०० कोटींची हमी दिली आहे. ते म्हणाले की सरकारने दिलेली हमी विमान कंपनीला निधी मिळवून देण्यास मदत करेल. एअर इंडिया आधीच बँकांशी निधीबाबत चर्चा करीत आहे असेही ते म्हणाले. अंदाजानुसार, २०१८-१९ मध्ये एअर इंडियाला आठ हजार पाचशे छप्पन.३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यात नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी संसदेत सांगितले होते की, एअर इंडियाचे खाजगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करावी लागेल.