नागपूर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यापैकी २ हजार १०० कोटी रूपये वितरित केल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते.
मंत्री म्हणाले कि, सरकारमार्फत मदतीचे वाटप असून, मंजूर केलेल्या ६ हजार ६०० कोटी रुपयांपैकी२ हजार १०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित करण्यात आले आहे. शिल्लक राहिलेली रक्कम लवकरच जमा होईल असेही ते म्हणाले.
पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्राकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी संगीतले.राज्यातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत राज्य सरकार करेल, शेतकऱ्यांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे विरोधकांना ठणकावून सांगितले