मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ‘रास्ता रोको’ केला होता. या विद्यार्थ्यी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग नोंदवला होता. या आंदोलनाच्या यशानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी गरजू परीक्षार्थींना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांशी बोलतांना पडळकर म्हणाले की,’एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रं द्या, अन्यथा मुंबईत येऊन उग्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला आहे. जूनमध्ये झालेल्या परीक्षेचं नियुक्तीपत्रं देण्याने कोरोना नियमांचा फज्जा कसा उडेल?, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
ते पुढे म्हणाले, पुण्यातील आंदोलनावेळी मला विद्यार्थ्यांच्या भावना महत्वाच्या होत्या. म्हणून मी सहभागी झालो होतो. मला काही दिवसांपूर्वी मला काही विद्यार्थ्यांचा फोन आला की पत्रकार भवनाच्या इथे आम्ही आंदोलन करणार आहे आणि पत्रकार परिषद घेणार आहोत. मात्र इथे आल्यावर मला कळलं की पोलिसांनी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थांबू दिलं नाही. पोलिसांनी दडपशाही केली.
तत्पूर्वी, या आंदोलनाच्या यशानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी गरजू परीक्षार्थींना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. पडळकर म्हणाले की, सरकार म्हणत की, परीक्षा घेण्यास सुविधा नाही. २१ तारखेला परीक्षा व्हायलाच हवी. अन्यथा मी वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार आहे. अनेक विद्यार्थी सेंटरवर येऊन थांबली आहेत. या विद्यार्थ्यांना सात दिवसांचा भत्ता २० हजार रुपये द्या. तसेच विद्यार्थ्यांना दोन वर्षे वाढवून देण्याची मागणी पडळकरांनी केली आहे.