नवी दिल्ली – मालवाहतुकीचे अथवा अवजड सामुग्रीच्या वाहतुकीचे सर्वात स्वस्त, किफायती आणि विश्वसनीय नाव म्हणजे रेल्वे मालगाडी. आता रेल्वे मंत्रालयाने देशभर कोणालाही रेल्वेने माल पाठवायचा असेल, तर एकच राष्ट्रीय नंबर 139 या क्रमांकाने जाहीर केला असून मालवाहतूक यंत्रणेचे सुसूत्रीकरण आणि सुलभीकरण केले आहे.
आपले पार्सल, शेतमाल अथवा घरसामान दुसऱ्या गावात न्यायचे असेल, तर अशा ग्राहकांनी अथवा कंपन्यांनी फक्त 139 क्रमांक डायल केल्यास त्यांना दोन्ही ठिकाणांमधील अंतर, वजन अथवा आकारमानानुसार पार्सल वाहतुकीचे दर, जवळची रेल्वे स्थानके आणि ऑनलाईन पेमेंटची सुविधा यासह पार्सल ट्रॅकिंगची लिंक अशा विविध अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत.
Now you can dial a single all-India contact number to transport your goods via @RailMinIndia. With this, Indian Railways is set to emerge as the most preferred mode of goods transportation!
Have cargo to transport?
Simply dial 139! #FreightFriendlyRailways@PiyushGoyal @PMOIndia pic.twitter.com/vMcvyKwwuv— MyGovIndia (@mygovindia) March 13, 2021
त्यासाठी इच्छुक ग्राहकांनी रेल्वेची राष्ट्रीय हेल्पलाईन असलेल्या 139 या क्रमांकाला डायल करुन नंतर 6 हा क्रमांक दाबायचा आहे. मग रेल्वे पार्सल सुविधेची सर्व माहिती येथे दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने कळवले आहे.