Gopichand Padalkar : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात मराठा समाज, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाने सरकारच्या नाकी नऊ आणल्याचे दिसत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट इशारा दिला आहे.
राज्यातील धनगर आरक्षणविषयी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी,”तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी”, असा थत इशारा पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देताना,”माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने 50 दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे. आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला”, असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल, ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे, असे त्यांनी म्हटले.
तसेच “समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे”, असे गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.