पुणे – लॉकडाऊन पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवासी वाहतूक स्थगित केली आहे. या कालावधीत उत्पन्नाचा ट्रॅक बदलला असून, सध्या मालवाहतुकीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुणे विभागाकडूनदेखील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
चिंचवडहून जवळपास 9 वर्षांनंतर वाहनांची वाहतूक झाली. यासह पुणे विभागातून शुक्रवारी एकाच दिवशी 75 मालगाड्यांचे विक्रमी संचलन झाले.
सध्या मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागांतून माल वाहतूक करण्यात येत आहे. याद्वारे रेल्वेला मोठा महसूलदेखील मिळत आहे. 2 सप्टेंबर रोजीदेखील 70 गाड्यांची ये-जा झाली होती. तर शुक्रवारी (4 सप्टेंबर) रोजी पुणे विभागात दौंड, मिरज आणि लोणावळा या ठिकाणांमार्गे 75 मालगाड्यांची ये-जा झाली.