नवी दिल्ली – देशात कोविड19 चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 91 टक्के झाला आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या 79 लाख 90 हजाराहून अधिक झाली असून, यापैकी 72 लाख 59 हजाराहून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्तीचा दर 90 पूर्णांक 85 शतांश टक्क्यावर पोहोचला आहे.
सध्या देशात या संसर्गाचे 6 लाख 10 हजार 803 सक्रीय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 10 एवढी झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर 1.5 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल दिवसभरात एकूण 10 लाख 66 हजार 786 नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण दहा कोटी 54 लाख 87 हजार 680 कोविड चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली.