मुंबई – अभिनेता नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचे लोकांना वेड लावले आहे. नसीरुद्दीनला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात.
अलीकडेच त्यांची ‘ताज: रेन ऑफ रिव्हेंज’ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. ज्यामध्ये त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले. मात्र, असे असले तरी नसिरुद्दीन शहा आपल्या हटके आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर सडकून टीका केली होती.
यावेळी ते म्हणाले होते.. ‘अफवाह’, ‘भीड’, ‘फराज’ सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटले. पण केरळ स्टोरीने धुमाकूळ घातला आहे. लोक केरळ स्टोरीबाबत मोठमोठ्या गोष्टी करत आहेत. हा एक ट्रेंड आहे. मी अद्याप हा चित्रपट बघितलेला नाही आणि माझी बघायची इच्छाही नाही, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.
दरम्यान, आता नसीरुद्दीन शाह यांच्या या टीकेला भाजप नेते आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. “नसीरुद्दीन शाह अभिनेते म्हणून चांगले आहेत मात्र त्यांची नियत खराब आहे. केरळ स्टोरी चित्रपट एफआयआरच्या आधारावर बनला आहे.
तुमची जर हिंमत असेल तर याविरोधात कोर्टात जा. बोलणं सोप्पं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी हे वक्तव्य करत स्वत:चा जो परियच दिलाय तो एक भारतीय म्हणून खूपच वाईट आहे.” असं खोच टीका मनोज तिवारी यांनी केली आहे.