पणजी – गोव्यात जगभरातून पर्यटक येत आहे. मात्र गोव्यातील स्थानिकांकडे दुर्लक्ष होत आहे. गोव्याचा विकास होताना दुर्दैवाने पर्यावरणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा, असा सवाल करत महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर उरलेले असताना आदित्य ठाकरे यांनी गोव्यात पहिल्याच सभेत ‘गोव्याची शान, धनुष्य बाण’ अशी घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गोव्याशी शिवसेनेची नाते वेगळे आहे. अनेकांची मंदिरे, कुलदैवत गोव्यात आहे. स्थानिक भूमीपत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे. आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत. तर आम्ही या पुढे गोव्यातील जनतेसोबत राहून काम करणार आहे. गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली आहे.