बिरदवडी येथील कोपरासभेत अतुल देशमुख यांचे आवाहन
शिंदे वासुली- ज्यांना स्वत:च्या घरासमोरील रस्ता करता येत नाही ते तालुक्याचा विकास काय करणार ? आता आजी नको आणि माजी नको, नवीन चेहऱ्याला संधी द्या, असे आवाहन अतुल देशमुख यांनी मतदारांना केले.
खेड-आळंदी विधानसभेचे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा पिंपरी-पाईप जिल्हा परिषद गटातील रोहकल ते शिंदे वासुली गावभेट दौऱ्या दरम्यान बिरदवडी येथील कोपरा सभेत देशमुख यांनी वरील आवाहन केले. यावेळी बिरदवडीचे सरपंच मोहन पवार यांनी गावच्या वतीने पुर्ण पाठिंबा देत विजयाचा श्रिफळ दिला. गावभेट दौरा व कोपरा सभेत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाब खांडेभराड, भाऊसाहेब कुटे, कान्हेवाडीचे माजी सरपंच राहूल येवले, कैलास गाळव, चाग़देव शिवेकर, काळूराम पिंजण, संजय रौंधळ, दत्ता माड़ेकर, विजय रत्नपारखी, कैलास पडवळ, दत्तात्रय घनवट, अरुण लिंभोरे, दत्तात्रय टेमगीरे, किसन पिंजण, शिवाजी कावरे, भानुदास बुट्टे, संदिप देशमुख, किसन नवले, रामदास कोळेकर, योगेश घुले, दत्ता परदेशी, बाळू मुळे, एकनाथ पवार आदी कार्यकर्ते, विविध गावांचे सरपंच- उपसरपंच, महिला – पुरुष- तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतुल देशमुख म्हणाले की, खेड तालुक्याने माजी आमदारांना दोनवेळा निवडून दिले. त्यांच्या कारभाराला जनता कंटाळली म्हणून आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी परिवर्तन करुन सुरेश गोरे यांना आमदार केले. पण त्यांनीही भ्रमनिरास केला. म्हणून मी जनतेसाठी, तालुक्याच्या विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.
खेडचा निवडणूक आखाडा गरम व्हायला लागला आहे. यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप मोहिते पाटील, शिवसेनेचे सुरेश गोरे व अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात तिरंगी तुल्यबळ लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उमेदवारांच्या आरोप-प्रात्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. काही वेळा वैयक्तिक टीका ही होऊ लागली आहे. परंतु अपक्ष उमेदवार देशमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करण्याच्या फंदात न पडता विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचे पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सुनील देवकर, सुरेश पिंगळे या कार्यकर्त्यांनी नमूद केले.
- अतुल देशमुख यांना निवडून द्या. तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू, एमआयडीसीत रोजगार मिळवून देऊ, प्रकल्ग्रपस्तांचे प्रश्न सोडवू.
– शरद बुट्टे पाटील, गटनेते, जिल्हा परिषद - शरद बुट्टे पाटील व माझे काहीच वाकडे नाही; परंतु आजी-माजींनी आमच्यात दुही माजवून त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली. आता आम्ही आमच्यातले मतभेद विसरून अतुल देशमुखांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.
– कैलास गाळा, सदस्य, जिल्हा नियोजन समिती