जयपूर- राजस्थानातील 3.57 लाख कुटुंबांना पुढील दोन महिने मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक कुटुंबाना प्रत्येक कुटुंब दहा किलो गहू आणि दोन किलो डाळ दिली जाणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून हे अन्नधान्य वाटले जाणार आहे.
राज्यातील गरजू कुटुंबांची पहाणी करून त्यांची यादी निश्चित करण्यात आली असून त्या यादीतील कुटुंबांना पुढील दोन महिने तरी मोफत अन्नाची सुविधा यातून दिली जाणार आहे. राजस्तान सरकारने गरिबांसाठी राज्यात अन्यही अनेक उपक्रम राबवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.