पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाघोली ग्रामस्थांनी अभिनव उपक्रम राबवत बारा हजार लोकांना मोफत अन्नदान उपलब्ध करून दिले आहे. ग्रामस्थांतर्फे रोज तीन ठिकाणी अन्न शिजवून गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करण्यात येते.
ग्रामस्थांच्या या अभिनव उपक्रमामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून आज राज्यात कोरोनाचे ४९ नवे रुग्ण आढळले आहेत.