Accident – हरियाणातील दिल्ली जयपूर हायवेवर गुरुग्राममध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या तेलाच्या टॅंकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारने पेट घेतला.
त्यामुळे कारमधील जण जिवंत जाळले. या अपघातात पिकअप चालकाचाही मृत्यू झाला. गुरुग्राम जिल्ह्यातील सिद्धरावली गावात रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. जयपूरहून हायस्पीड ऑईल टॅंकर येत होता.
त्यानंतर तो दुभाजक तोडून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या लाईनमध्ये घुसला. यादरम्यान जयपूरकडे जाणाऱ्या कारला टॅंकरची धडक बसली. यानंतर टॅंकरने ग्रील तोडून सर्व्हिस लेनला जाऊन समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक दिली. स्विफ्ट कारमध्ये सीएनजी सिलिंडर असल्याने आग लागली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच 3 जणांचा बळी गेला होता. अपघातानंतर ऑइल टॅंकरचा चालक पळून गेला.