food poisoning । हिंगोलीत भाविकांना महाप्रसादातील भगर खाल्ल्याने पुन्हा एकदा विषबाधा झाली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद देण्यात आला. तो खाल्ल्याने ३१५ जणांना गुरुवारी रात्री त्रास झाला. डॉक्टरांनी गावातच ३०६ जणांवर उपचार केले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही ९३ जणांवर प्रथमोपचार करण्यात आले.
हिंगोली येथे महाप्रसादातील भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली होती. याशिवाय परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत.
food poisoning । हिंगोलीत यापूर्वीही भाविकांना विषबाधा झालेची घटना
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे गेल्या पाच दिवसा पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 20 फेब्रुवारी रोजी एकादखीच्या निमित्ताने उपवास असणाऱ्या भाविक भक्तांसाठी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 40 किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता या महाप्रसादातून 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली होती.
food poisoning । हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नाही
हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन सुमारे 24 वर्षाचा कालावधी झाला तरी हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु झाले नाही. परभणी येथूनच या कार्यालयाचा कारभार पाहिला जात आहे. त्यामुळे जिल्हयात भेसळखोरांना रान मोकळे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी केवळ महिन्यातून एकदा हिंगोलीत येत असल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा
सावधान…! तुम्ही सुद्धा भगर खाताय तर, अशी घ्या काळजी नाही तर होईल ‘विषबाधा’